अकोला – अकोट तालुक्यातील पिलकवाडी या गावातील समता महिला शेतकरी गटाला अभिनेता अमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनचे बक्षिस नुकतेच मिळाले आहे. यानिमित्ताने अकोला जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी समता महिला शेतकरी गटाचा सत्कार पिलकवाडी या त्यांची गावी जाऊन केला. या सत्काराला उत्तर देताना या समता महिला शेतकरी गटातील शेतकरी महिलांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर, अंजली ताई आंबेडकर यांच्यासह अकोला जिल्हा वंचितच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.
आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून रासायनिक शेती न करता भरघोस उत्पन्न मिळवणाऱ्या शेतकऱ्यांच्या गटाला बक्षीस जाहीर करण्यात आले आहेत. यासाठी अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातून अनेक शेतकरी गट या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. पीलकवाडी येथील शेतीकरी महिलांनी देखील समता शेतकरी गट तयार करून या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. या समता शेतकरी महिला गटांनी कोणतेही रासायनिक खत न वापरता भरघोस उत्पन्न दिल्याबद्दल या गटाला पाणी फाउंडेशने बक्षिस जाहिर केले होते.
नुकताच पुणे येथील बालेवाडी स्टेडियममध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अनेक सेलिब्रिटींसोबत अभिनेता आमिर खान यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये समता शेतकरी महिला गटाला यासाठी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हा पदाधिकारी यांनी समता शेतकरी गटाच्या सर्व महिलांचा सत्कार केला आहे. तसेच समता शेतकरी महिला गटाला मार्गदर्शन केलेल्या गावंडे साहेब व सराफ साहेब यांचा देखील सत्कार वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला. यावेळी वंचित बहुजन आघाडी पदाधिकाऱ्यांनी दुर्गम भागातील छोट्या गावात येऊन महिलांना प्रोत्साहन मिळावे म्हणून महिलांचा सत्कार केल्या बद्दल वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर, अंजली ताई आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. समता शेतकरी महिला गटाच्या वतिने अध्यक्ष पल्लवी ताई मोरदे यांनी वंचितचे आभार मानले आहेत.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचेअकोला जिल्हा अध्यक्ष प्रमोद देंडवे, महासचिव मिलिंद इंगळे, माजी पंचायत समिती सदस्य मुस्ताक भाई, माजी पंचायत समिती सभापती राजू एखे, संजय बुथ, संध्या मोरदे, विद्या मोरोदे, सोनू तायडे, दुर्गा मोरोदे, रूपाली मोरोदे, अश्विनी मोरदे, राहुल लाहोळे, गोपाल ढोरे, संजय खंडारे, शंकर मोरोदे, रमा तायडे, हर्षा मोरोदे, अनिता इंगळे, आशा मोरोदे, दिलीप मोरोदे, उत्तमराव मोरोदे, प्रियंका मोरोदे, प्रदीप पळसपगार, सुयोग आठवले, केशव पाटील, विलास मोडक, संतोष वाघमारे, सुनील वाघमारे, भीमराव तायडे, अमर मोरोदे, नामदेव वाघमारे, राजू वाघमारे, मनोज वाघमारे, राम इंगळे, राजू मोडक, गणेश गवई, गोपाल वाघमारे, यांच्यासह गावातील अनेक महिला पुरुष उपस्थित होते.