Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

प्रा. भारत सिरसाट यांनी बौद्धांचा सांस्कृतिक वारसा पुढे आणला; भन्ते डॉ. एम. सत्यपाल

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
December 26, 2022
in बातमी, सामाजिक, सांस्कृतिक
0
प्रा. भारत सिरसाट यांनी बौद्धांचा सांस्कृतिक वारसा पुढे आणला; भन्ते डॉ. एम. सत्यपाल
       

औरंगाबाद – रमाई प्रकाशन प्रकाशित ‘‘भारतीय बौद्ध महासभा : कार्य व इतिहास’’ या ग्रंथाचे संपादन आणि प्रकाशन करून प्रा. भारत सिरसाट यांनी बौद्धांचा सांस्कृतिक वारसा पुढे आणला, असे गौरोद्गार पालि साहित्याचे गाढे अभ्यासक भन्ते डॉ. एम. सत्यपाल यांनी काढले.

ते सूर्यपूत्र भैय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर प्रतिष्ठान आयोजित ‘‘भारतीय बौद्ध महासभा : कार्य व इतिहास‘‘ ग्रंथाच्या परिसंवाद कार्यक्रमातून बोलत होते. स्थानिक मौलाना आझाद संशोधन केंद्र येथे (दि. १२ डिसेंबर रोजी) भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी डॉ. संजय मून हे होते. वक्ते म्हणून प्रसिद्ध समीक्षक डॉ. ऋषिकेश कांबळे, सत्यशोधक समाज प्रतिष्ठानचे अॅड. के. ई. हरिदास, सूर्यपूत्र भैय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. भारत सिरसाट आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना भन्ते सत्यपाल म्हणाले की, भारतीय बौद्ध महासभेची उद्दिष्ट्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १० कलमी कार्यक्रमातून दिली होती. त्यामध्ये बौद्ध साहित्य आणि संस्कृती प्रचार-प्रसार प्रकाशन संस्थांनी चालवावा, असे निर्देश त्यांनी दिले होते. या ग्रंथाच्या निमित्ताने ‘रमाई प्रकाशन’ने हा वारसा जोपासला आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. भारत सिरसाट यांनी प्रास्ताविकात सांगितले की, या ग्रंथाचे प्रकाशन मुंबई येथे भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते नुकतेच झाले असून, भारतीय बौद्ध महासभेच्या एकूण कार्यावर चर्चा व्हावी या हेतूने या परिसंवादाचे आयोजन केले आहे.डॉ. ऋषिकेश कांबळे म्हणाले की, त्याग आणि समर्पणाशिवाय चळवळ उभी राहत नाही. निष्ठा असल्याशिवाय चळवळीचा विचार व्यापक दृष्टीने पुढे नेता येत नाही. प्रा. सिरसाट यांनी संपादित केलेला ग्रंथ भय्यासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा ख-या अर्थाने गौरव करणारा आहे. हा ग्रंथ येणा-या पिढीला निश्चितच दिशादर्शक ठरणार आहे. डाॅ. संजय मून बोलताना म्हणाले की, भैय्यासाहेब आंबेडकरांकडे राजकीय नेतृत्व जावू नये म्हणून जाणीवपूर्वक तत्कालीन नेत्यांनी भारतीय बौद्ध महासभेची जबाबदारी त्यांच्यावर दिली. भैय्यासाहेब हे बाबासाहेबांचे वैचारिक वारसदार होते. त्यांनी भारतीय बौद्ध महासभेला एका मोठ्या पातळीवर नेले. त्याचा संपूर्ण इतिहास या ग्रंथामध्ये शब्दबद्ध झाला आहे. अॅड. के. ई. हरिदास म्हणाले की, भैय्यासाहेब आंबेडकरांना मिशनरी पद्धतीने बौद्ध धम्माचा प्रचार-प्रसार करावयाचा होता. त्या दृष्टीने भारतीय बौद्ध महासभेने कृती कार्यक्रम आखून त्या पद्धतीचे प्रयत्न करणे गरजेचे आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शिवाजी डोळसे यांनी केले, तर आभार अमरदीप वानखडे यांनी मानले. या प्रसंगी डाॅ. यशवंत खडसे, रतनकुमार साळवे, डाॅ. रेखा मेश्राम, दैवशिला गवंदे, ललीता खडसे, डाॅ. अविनाश अंकुशराव, व्ही. के. वाघ, सिद्धार्थ चौरपगार, देवानंद पवार, जितेंद्र भवरे, विलास पांडे, यशवंत भंडारे, मंगल मून, सुरेखा चौरपगार, अनुमती तिडके, शंकर मेश्राम, शाहीर उत्तमराव म्हस्के, एकनाथ पाखरे आदींसह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


       
Tags: Bhaiyyasaheb AmbedkarBharat ShirsatBuddhist society of India
Previous Post

महिलांनी संघटीत होऊन दृष्टी प्रवृत्तींशी लढण्याची गरज

Next Post

मा. अशोकभाऊ सोनोने यांची हिंगोली जिल्हा कार्यालयाला भेट

Next Post
मा. अशोकभाऊ सोनोने यांची हिंगोली जिल्हा कार्यालयाला भेट

मा. अशोकभाऊ सोनोने यांची हिंगोली जिल्हा कार्यालयाला भेट

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
घाटकोपर दरड दुर्घटनेची स्नेहल सोहनी यांच्याकडून पाहणी; पीडित कुटुंबीयांना मदतीचे आश्वासन
बातमी

घाटकोपर दरड दुर्घटनेची स्नेहल सोहनी यांच्याकडून पाहणी; पीडित कुटुंबीयांना मदतीचे आश्वासन

by mosami kewat
August 16, 2026
0

मुंबई : घाटकोपर येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेची वंचित बहुजन महिला आघाडीच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष स्नेहल सोहनी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी...

Read moreDetails
अपुऱ्या सुविधा आणि दुरवस्थेविरोधात वरळीत वंचित बहुजन आघाडी आक्रमक; जी दक्षिण मनपा कार्यालयावर तिरडी मोर्चा

अपुऱ्या सुविधा आणि दुरवस्थेविरोधात वरळीत वंचित बहुजन आघाडी आक्रमक; जी दक्षिण मनपा कार्यालयावर तिरडी मोर्चा

August 16, 2026
अंजलीताई आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली अकोल्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन नियोजनाची बैठक

अंजलीताई आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली अकोल्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन नियोजनाची बैठक

August 16, 2026
कांदिवलीत वंचित बहुजन आघाडीतर्फे ‘ज्येष्ठ नागरिक व नाका कामगार कट्टा’चे अनावरण

कांदिवलीत वंचित बहुजन आघाडीतर्फे ‘ज्येष्ठ नागरिक व नाका कामगार कट्टा’चे अनावरण

August 16, 2026
कावड मार्ग उजळला; निलेश देव यांच्या पाठपुराव्याला यश!

कावड मार्ग उजळला; निलेश देव यांच्या पाठपुराव्याला यश!

August 16, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home