Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

विषमतेविरोधातली काव्यात्मक बंडाळी म्हणजे ‘आरंभाच्या दारात!’

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
January 22, 2022
in Uncategorized
0
विषमतेविरोधातली काव्यात्मक बंडाळी म्हणजे ‘आरंभाच्या दारात!’
       

विषमतावादी प्रवाहाच्या विरोधात परखडपणे एक भूमिका घेऊन व्यक्त होणारे फार बोटावर मोजण्याइतके कवी आपल्याला देशात दिसून येतात. कुण्या एका विद्वानाने म्हटलं होत, ‘जर आपल्याला त्या देशाचं भविष्य काय असेल हे पाहायचं असेल तर, तिथले साहित्यिक, कवी काय लिहतात ते पाहावं लागत.’ देशभरात तुमच्या आमच्या जीवावर उठलेली व्यवस्था, आमचं अस्तित्व नाकारणारी व्यवस्था, सगळी संसाधने आपल्याच मालकीत राहावी असे मानणारी व्यवस्था आणि यांचे समर्थक याच्या विरोधात संविधानची कविता इथल्या वंचितांची, शोषितांची, कार्यकर्त्यांची बाजू मांडते. तर व्यवस्थेवर विद्रोही आसूड ओढत बुद्धाचा सम्यक मार्ग मांडते. शरद कुमार लिंबाळे म्हणतात, ‘आपण आधी कार्यकर्ता असतो, नंतर साहित्यिक होतो.’ असाच आमचा मार्गदर्शक कार्यकर्ता मित्र -बंधू संविधानने गांगुर्डे ‘आरंभाच्या दारात’ काव्यसंग्रहाच्या माध्यमातून साहित्य विश्वात पदार्पण केलं आहे.

पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर कधी ते हाती लागतं, आणि वाचून काढते अशी उत्सुकता होतीच! अर्थात त्याला कारण ही तसेच आहे, कारण त्याच्या कविता आम्ही कधी समजमध्यामात तर कधी प्रत्यक्षात ऐकल्या होत्याच. त्यामुळे त्याच्या या प्रवासाचे आम्ही साक्षीदार आहोत. अखेर आरंभाच्या दारात हा काव्यसंग्रह हाती आला आणि लगेचच तो वाचून पूर्ण केला.

‘आरंभाच्या दारात’ची सुरुवातच ‘या डिजिटल युगात आपण कोण?’ असा परखड सवाल करत आपला लढा लढण्याचं कारण सांगते, तर ‘पाणी, भूक, धर्म, देश आणि मी, हाथरसच्या निमित्ताने, भिरकवलेल्या दगडाची’ गोष्ट या कवितेच्या माध्यमातून इथल्या व्यवस्थेचं, विषमता अन् आमचं संघर्ष याच चपखल वर्णन करते. कवी त्याच्या भाषणात म्हणतो ‘आमची कविता, आमचं साहित्य हेच खरं आहे रे वर्गाचं मुख्य प्रवाहाचं साहित्य आहे, कारण आमचं साहित्य हे वास्तववादी, प्रेरणादायी आणि सकारात्मक साहित्य आहे.’ आणि या कविता संग्रहातून असच काही वाचकांना वाचायला मिळतं.

भारतासारख्या देशात जेव्हा आपण एका रिसोर्सेसलेस समूहातून येतो, तेव्हा या कठीण परिस्थितीतही टिकून राहणं गरजेचं असतं. ‘दगडफुल’ प्रकाशनाच्या मध्यमातून हाही फार महत्त्वाचा संदेश इथे आपल्याला मिळतो.

‘आरंभाच्या दारात’ कवितेत कवी म्हणतो, ”कवितेला आता सृजनशील काव्याची गरज आहे.. तिला आता क्रांतिकारकांची गरज आहे.” कवीच्या लिखाणातून सृजनशील काव्य घडेल आणि क्रांतिकारक लिखाण घडेल असा विश्वास आहे. तसेच या काव्यसंग्रहातून आदर्श, भूमिका, घेऊन नवे चेहरे नक्कीच येतील अशी आशा आहे.

या देशाच्या विषमतावादी व्यवस्थेविरोधात अनेकजण आप आपल्यापरीने, आपला विचार घेऊन लढत आहेत. देशात अनेक वादाचा (इझम) पर्याय असताना आमच्या क्रांतीचा मार्ग हा ‘सम्यक क्रांती’चाच असेल हा अत्यंत महत्वाचा संदेश या संग्रहातून आपल्यापर्यंत पोहचतो. आणि ही क्रांती घडवून आणायची असेल तर आपल्या बापाने सांगितलेलं, “सिस्टिम बदलने के लिये सिस्टिम बनाना पडता है” एवढी साधी क्रांतीची व्याख्या आपल्याला न समजलेली व्याखा समजून घेत, “राजगृह ची दिशा धरून आगेकूच व्हायला हवं”. म्हणत कवी आपल्याला मार्गदर्शक दिशा दाखवतो. कवी संविधान गांगुर्डे यास ‘आरंभाच्या दारात’मधून साहित्य क्षेत्रात झालेलं पदार्पण, या साहित्याच्या रोपट्याचा महावृक्ष होवो या मंगल सदिच्छा!

-स्नेहल सोहनी
(लेखिका वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी आहेत)


       
Tags: Arambhachya DaratPoetSanvidhan GangurdeSnehal Sohaniआरंभाच्या दारातविषमता
Previous Post

ढोंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून सावधान !

Next Post

कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी कडून भेदभावविरोधी धोरणात ‘जाती’चा समावेष

Next Post
कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी कडून भेदभावविरोधी धोरणात ‘जाती’चा समावेष

कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी कडून भेदभावविरोधी धोरणात 'जाती'चा समावेष

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
‎'रक्षकच भक्षक बनू नये', पोलिसांना राखी बांधून वंचित बहुजन महिला आघाडीने केली जबाबदारीची जाणीव
बातमी

‎’रक्षकच भक्षक बनू नये’, पोलिसांना राखी बांधून वंचित बहुजन महिला आघाडीने केली जबाबदारीची जाणीव

by mosami kewat
August 11, 2025
0

‎अकोला - वंचित बहुजन महिला आघाडीच्या अकोला जिल्हा शाखेने नुकताच रक्षाबंधन सण अनोख्या पद्धतीने साजरा केला. अकोला जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक...

Read moreDetails
‎निवडणूक गोंधळा बाबत फक्त मोर्चे काढून न्याय मिळणार नाही, न्याय कोर्टातूनच मिळू शकतो - प्रकाश आंबेडकर

‎निवडणूक गोंधळा बाबत फक्त मोर्चे काढून न्याय मिळणार नाही, न्याय कोर्टातूनच मिळू शकतो – प्रकाश आंबेडकर

August 11, 2025
मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भीमराव आंबेडकर यांनी आजोबांच्या शाळेला दिली भेट

मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भीमराव आंबेडकर यांनी आजोबांच्या शाळेला दिली भेट

August 11, 2025
'काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची वरातीमागून घोडं अशी स्थिती ;‎'इंडिया' आघाडीच्या कार्यपद्धतीवर प्रकाश आंबेडकरांची टीका

‘काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची वरातीमागून घोडं अशी स्थिती ;‎’इंडिया’ आघाडीच्या कार्यपद्धतीवर प्रकाश आंबेडकरांची टीका

August 11, 2025
‎अकोल्यात आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक

‎अकोल्यात आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक

August 11, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home