Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home article

सोमनाथ सूर्यवंशी यांना ‘आंबेडकरच’ न्याय देणार !

Akash Shelar by Akash Shelar
December 15, 2025
in article, Uncategorized, बातमी, राजकीय, सामाजिक
0
सोमनाथ सूर्यवंशी यांना 'आंबेडकरच' न्याय देणार !

सोमनाथ सूर्यवंशी यांना 'आंबेडकरच' न्याय देणार !

       

लेखक – आकाश मनिषा संतराम

१० डिसेंबर २०२४ रोजी परभणी येथे भारतीय संविधानाच्या प्रतिमेची विटंबना झाली आणि त्यानंतर जे घडले, ते फक्त परभणी पुरते मर्यादित राहिले नाही. संविधानाच्या अवमानाविरोधात उभे राहिलेल्या नागरिकांवर झालेली पोलिसी कारवाई, त्यातून घडलेला सामाजिक तणाव आणि अखेरीस सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा न्यायालयीन कोठडीत झालेला मृत्यू या सगळ्या घटनांनी महाराष्ट्रातील लोकशाही व्यवस्थेची कठोर परीक्षा घेतली. आज या घटनेला एक वर्ष पूर्ण होत असताना, हा विषय आता आठवणीपुरता न ठेवता न्यायाच्या कसोटीवर तपासण्याची अधिक गरज निर्माण झाली आहे.

सोमनाथ सूर्यवंशी आंदोलक तर होतेच, पण ते संविधानावर विश्वास ठेवणारे, संविधानासाठी लढणारे, एक कायद्याचा विद्यार्थी आणि भीमसैनिक होते. ज्या ठिकाणी कायद्याने त्यांचे संरक्षण करायला हवे होते, त्याच न्यायालयीन कोठडीत त्याने आपला जीव गमावला. सुरुवातीला प्रशासनाकडून हृदयविकार, श्वसनाचा आजार अशी कारणे पुढे करण्यात आली. मात्र शवविच्छेदन अहवालात ‘Shock following multiple injuries’ हे कारण समोर आल्यानंतर, या मृत्यूमागील सत्य झाकण्याचा प्रयत्न उघड झाला. कोठडीत मृत्यू ही घटना एका सच्चा लोकशाहीवादी, संविधानवादी आंदोलकाच्या बाबतीत घडली, ही बाब लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे.

या प्रकरणात राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर दिसलेली उदासीनता अधिक चिंताजनक ठरली. काही निवडक प्रकरणांमध्ये न्यायासाठी जोरदार भूमिका घेतली जाते, मात्र सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूबाबत अनेकांनी मौन पाळले. उलट, एका अतिहुशार सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने दोषी पोलिसांना माफ करण्याची भूमिका मांडली, ज्यामुळे न्यायप्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्याचबरोबर दलित, आंबेडकरी आणि संविधानवादी समाजामध्ये “न्याय सर्वांसाठी समान आहे का?” हा प्रश्न चर्चेत आला.

या पार्श्वभूमीवर, आज वर्षपूर्तीच्या दिवशी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केलेकी ट्विट महत्त्वाचे आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, “सिर्फ सोमनाथ को याद करना काफी नहीं है, जवाबदेही और न्याय भी ज़रूरी है” हे त्यांनी केलेले भावनिक आवाहन नाही, तर लोकशाही व्यवस्थेच्या केंद्रस्थानी असलेल्या उत्तरदायित्वाची आठवण करून देणारा महत्वाचा आशय आहे. त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई सूर्यवंशी आणि वंचित बहुजन आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता न्याय मिळेपर्यंत ही लढाई थांबवणार नाहीत, अशी ठाम आणि रोखठोक भूमिका मांडली आहे.

या प्रकरणात ॲड. प्रकाश आंबेडकरांनी न्यायालयीन पातळीवरही काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष वेधले आहे. कोठडीत मृत्यू झाल्यानंतर तपासाची स्पष्ट, स्वतंत्र आणि निष्पक्ष यंत्रणा काय असावी, याबाबत कायद्यातील पोकळी अधोरेखित झाली आहे. त्याच संस्थेकडून चौकशी होणे ही प्रक्रिया नैतिकदृष्ट्या संशयास्पद ठरते, याकडेही लक्ष वेधले गेले. ॲड.आंबेडकरांनी उपस्थित केलेले हे मुद्दे सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणापुरते मर्यादित नसून, देशभरातील कोठडीतील मृत्यूंच्या घटनांसाठी दिशादर्शक ठरू शकतात.

सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाने आर्थिक मदतीपेक्षा न्यायाला प्राधान्य दिले आहे. सरकारकडून देण्यात येणारी मदत त्यांच्या आईने नाकारली, त्यांची ही कृती त्यांच्या स्पष्ट भूमिकेचे उदाहरण देते. न्याय म्हणजे आर्थिक भरपाई नव्हे, तर दोषींना शिक्षा, ही भूमिका त्यांनी ठामपणे मांडली आहे.

आज, या बलिदानाला एक वर्ष पूर्ण होत असताना, सोमनाथ यांना श्रद्धांजली देऊन मोकळे होणे हा मार्ग नाही. संविधानासाठी उभा राहिलेला तरुण न्यायालयीन कोठडीत मारला जात असेल आणि त्यावरही न्याय मिळत नसेल, तर तो केवळ एका व्यक्तीचा नव्हे, तर संपूर्ण लोकशाही व्यवस्थेचा पराभव असतो. न्याय मिळणे म्हणजे फक्त दोषींना शिक्षा नसते, तर सत्याचा विजय असतो आणि हा विजय वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई आणि वंचित बहुजन आघाडीचा हर एक कार्यकर्ता मिळवल्याशिवाय राहणार नाहीत अशी अपेक्षा संपूर्ण संविधानवादी, आंबेडकरवादी जनतेला आहे.


       
Tags: AccountabilityBahujanJusticeConstitutionMattersCustodialDeathJudicialCustodyJusticeForSomnathparbhaniPoliceAtrocitiesprakashambedkarRuleOfLawSaveDemocracySomnathSuryawanshivba
Previous Post

विश्वगुरूच्या नादात मोदींनी भारताला मित्र ठेवला नाही, दोन-तीन महिन्यांत पाकिस्तानसोबत पुन्हा युद्ध होईल! ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे मोठे विधान

Next Post

औरंगाबाद महानगरपालिका निवडणूक: वंचित बहुजन आघाडीकडून मुलाखती सुरू! प्रस्थापित पक्षांच्या माजी नगरसेवकांची मोठी गर्दी

Next Post
औरंगाबाद महानगरपालिका निवडणूक: वंचित बहुजन आघाडीकडून मुलाखती सुरू! प्रस्थापित पक्षांच्या माजी नगरसेवकांची मोठी गर्दी

औरंगाबाद महानगरपालिका निवडणूक: वंचित बहुजन आघाडीकडून मुलाखती सुरू! प्रस्थापित पक्षांच्या माजी नगरसेवकांची मोठी गर्दी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
भिवंडी मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयाचे उद्घाटन !
बातमी

भिवंडी मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयाचे उद्घाटन !

by mosami kewat
December 15, 2025
0

भिवंडी : भिवंडी मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयाचे उद्घाटन राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते यांच्या हस्ते करण्यात आले. शहराचे नवनियुक्त अध्यक्ष...

Read moreDetails
औरंगाबाद महानगरपालिका निवडणूक: वंचित बहुजन आघाडीकडून मुलाखती सुरू! प्रस्थापित पक्षांच्या माजी नगरसेवकांची मोठी गर्दी

औरंगाबाद महानगरपालिका निवडणूक: वंचित बहुजन आघाडीकडून मुलाखती सुरू! प्रस्थापित पक्षांच्या माजी नगरसेवकांची मोठी गर्दी

December 15, 2025
सोमनाथ सूर्यवंशी यांना 'आंबेडकरच' न्याय देणार !

सोमनाथ सूर्यवंशी यांना ‘आंबेडकरच’ न्याय देणार !

December 15, 2025
विश्वगुरूच्या नादात मोदींनी भारताला मित्र ठेवला नाही, दोन-तीन महिन्यांत पाकिस्तानसोबत पुन्हा युद्ध होईल! ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे मोठे विधान

विश्वगुरूच्या नादात मोदींनी भारताला मित्र ठेवला नाही, दोन-तीन महिन्यांत पाकिस्तानसोबत पुन्हा युद्ध होईल! ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे मोठे विधान

December 15, 2025
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात आज राज्य निवडणूक आयुक्त यांची पत्रकार परिषद

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात आज राज्य निवडणूक आयुक्त यांची पत्रकार परिषद

December 15, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home