मुंबई – राज्यातील विद्यार्थांचा अकरावी प्रवेश पुन्हा लांबणीवर गेला आहे. विद्यार्थ्यांची पहिली गुणवत्ता यादी 10 जून रोजी जाहीर होणार होती. ती आता २६ जून रोजी जाहीर होणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच प्रेवेश घेऊ पहाणाऱ्या विद्यार्थ्याचा हिरमोड झाला आहे. आता 26 जूनला होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेतील उशिरामुळे पालक आणि विद्यार्थी संघटनांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
राज्यात यंदा २०२५-२६ पासून ११वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन प्रणालीद्वारे होणार आहेत. यासाठी १२ लाख ७१ हजार २९५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर ९४३५ कनिष्ठ महाविद्यालये व उच्च माध्यमिक शाळा नोंदणीकृत आहेत. या 9435 नोंदणीकृत महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी प्रवेश घेऊ इच्छीत आहेत. मात्र आता ही प्रक्रिया पुन्हा लांबणीवर गेली असून 26 जून पासून सुरु होत आहे. पहिली गुणवत्ता यादी (प्रथम फेरी) १० जूनऐवजी आता २६ जून रोजी जारी केली जाणार आहे. शालेय शिक्षण संचालनालयाच्या नव्या वेळापत्रकानुसार आगामी क्रमवारीने २१–२६ जून दरम्यान अर्ज नोंदणी, १२–१४ जून दरम्यान शून्य फेरी प्रवेश, नियमित फेरी १७ जून हा अंतिम यादीचा दिवस, आणि २७ जून ते ३ जुलै दरम्यान प्रवेश घेण्यासाठी वेळ राखीव आहे. .