Prabuddh Bharat
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून पक्ष मजबूत करा; सुजात आंबेडकर यांचे आवाहन!

Prabuddh Bharat by Prabuddh Bharat
June 13, 2025
in बातमी, राजकीय
0
शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून पक्ष मजबूत करा; सुजात आंबेडकर यांचे आवाहन!

शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून पक्ष मजबूत करा; सुजात आंबेडकर यांचे आवाहन!

0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       

नाशिक : निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपल्या गावात, गल्लीत, पक्षाच्या माध्यमातून लोकांची कामे करावीत, जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेऊन शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून पक्ष संघटन मजबूत करण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केले. १२ जून रोजी नाशिकच्या परशुराम सायखेडकर सभागृहात आयोजित कार्यकर्ता आणि पदाधिकारी गुणगौरव सोहळ्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. विचारमंचावर मेळाव्याचे अध्यक्ष नाशिक महानगरप्रमुख अविनाश शिंदे, नाशिक जिल्हा समन्वयक दिशा पिंकी शेख, अरुण जाधव, चेतन गांगुर्डे, वामनराव गायकवाड, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष ऊर्मिला गायकवाड, युवा जिल्हाध्यक्ष दामोदर पगारे, युवा महानगरप्रमुख रवी पगारे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यकर्त्यांनी निवडणुकांसाठी कामाला लागा ―

आगामी सर्व निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. आपसांतील हेवेदावे विसरुन प्रत्येकाने प्रेमाने पक्षाच्या बळकटीकरणासाठी आणि आपल्या गावातील संस्थेवर वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकावण्यासाठी तन-मन-धनाने कामाला लागा, असे निर्देशही सुजात आंबेडकर यांनी यावेळी दिले. कानपिचक्या घेत सुजात अआंबेडकर म्हणाले की, राजकारण म्हटले की पाडापाडी आली. गनिमी कावे आलेत. एकमेकाचे पाय खेचणे आलेच. त्यामुळे आपण आपले कार्य करत राहून आपली प्रतिमा स्वतःच तयार करावी, आपले स्थान आपणच काम दाखवून बळकट करावे. माझ्यासोबत किंवा पक्षप्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत फोटो व्हायरल करून किंवा स्टेटसला ठेवून आपण निवडणुकीत मते मागू शकत नाहीत. त्याने आपला पक्षही निवडून येणार नाही. त्यामुळे पक्षाचे संघटन बळकट करण्यावर भर द्या. लोकांची कामे करा, घरोघरी वंचित बहुजन आघाडी पोहोचविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे. स्थानिक स्तरावर कार्यकर्ता हाच प्रकाश आंबेडकर यांचे नेतृत्व करत असतो. त्यामुळे पक्षाची आणि आपली प्रतिमा डागाळेल असे न वागता आगामी निवडणुकांमध्ये वंचितचा झेंडा फडकावण्यासाठी सामर्थ्याने आणि स्वाभिमानाने लढा, सल्लाही सुजात आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना शेवटी दिला.पुढे बोलताना सुजात आंबेडकर म्हणाले की, आज नाशिकमध्ये येण्याचे प्रमुख आणखी एक कारण, म्हणजे आदिवासी आयुक्तालयावर काढण्यात आलेला मोर्चा होय. अनुसूचित जाती-जमातीचा निधी इतरत्र वळविण्यात आला असून, आदिवासी बांधवांवर अन्याय होत आहे. याबाबीकडे आयुक्तांचे लक्ष वेधून आदिवासी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी आलो. यावेळी आयुक्त लीना बनसोड यांच्याशी चर्चा झाली असून, येत्या काही दिवसांत संयुक्त बैठक घेऊन यावर तोडगा काढणार असल्याचे आश्वासन बनसोड यांनी दिल्याचे आंबेडकर यांनी सांगितले

अपघातांतील बळी; सरकारचे अपयश ―

महाराष्ट्रात झालेला बस अपघात, बंगळुरूतील चेंगराचेंगरीतील बळी, छत्रपती संभाजीनगर येथील सिद्धार्थ उद्यानातील भिंत कोसळून आणि विमान अपघातात गेले बळी हे सरकारचे अपयश आहे. कारण, सरकार निष्काळजी आहे. सरकार वाहतूक आणि प्रवासी सुरक्षा याबाबत उदासीन आहे. खासगीकरणाचा सर्व ठिकाणी घाट घालून ठेकेदारांना पोसण्याचे काम सरकार करत आहे. ज्या ठिकाणांवर चुकीचे बांधकाम दिसेल तिथे वंचितचे कार्यकर्ते जातील आणि संबंधितांना जाब विचारतील आणि पुढील कार्यवाही करतील असेही सुजात आंबेडकर म्हणाले.आगामी निवडणुकांची रणनीती आणि रिक्त असलेल्या जिल्हाध्यक्ष पदाबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले की, आगामी निवडणुकांसाठी आम्ही तयार आहोत. भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष वगळून इतरांशी चर्चेस आम्ही तयार आहोत. आघाडीसाठी आमचे दरवाजे खुले आहेत. नाशिक जिल्हाध्यक्ष पदाचा देखील लवकरच निर्णय होईल. प्रत्येक कार्यकर्ता आमचा नेता आहे. जिल्हाध्यक्ष नसतानाही आजचा मेळावा उत्साहात पार पडलाच ना. त्यामुळे कार्यकर्ते हीच आमची ताकद असून, पुढील निर्णयही लवकरच घेतले जातील. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील जनता सुज्ञ असून, कार्यकर्त्यांनी तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पक्ष पोहोचवावा, त्यांना ऊर्जा मिळावी यासाठी आपण नाशिक दौरा केल्याचेही ते म्हणाले. संजय साबळे, दीपक पगारे, बाळासाहेब शिंदे, दीपचंद दोंदे, मिहीर गजबे, संदीप काकळीज, सुनील साळवे, रेखा देवरे आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले. सूत्रसंचालन विश्वनाथ भालेराव यांनी केले केले.


       
Tags: maharashtrapoliticsnashilkpoliticsSujat AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

Pune crime news : धक्कादायक! येरवड्यात टॉवेलच्या काठाने गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न

Next Post

Pimpari Chinchwad : ‘लो एमिशन जोन्स’सारख्या संकल्पना केवळ पर्यावरणपूरक नसून, जीवनशैलीच्या दिशेने उचलेले एक महत्त्वाचे पाऊल असते – आयुक्त शेखर सिंह

Next Post
Pimpari Chinchwad : ‘लो एमिशन जोन्स’सारख्या संकल्पना केवळ पर्यावरणपूरक नसून, जीवनशैलीच्या दिशेने उचलेले एक महत्त्वाचे पाऊल असते – आयुक्त शेखर सिंह

Pimpari Chinchwad : 'लो एमिशन जोन्स'सारख्या संकल्पना केवळ पर्यावरणपूरक नसून, जीवनशैलीच्या दिशेने उचलेले एक महत्त्वाचे पाऊल असते - आयुक्त शेखर सिंह

अभिजात मराठी "कोसळते" तेव्हा...
विशेष

अभिजात मराठी “कोसळते” तेव्हा…

आज सकाळी , नेहमीप्रमाणे सगळी वृत्तपत्रे घेऊन बसलो होतो. आधी मराठी वर्तमानपत्रांचा गठ्ठा काढला आणि धक्काच बसला. जवळपास सगळ्याच वर्तमानपत्रांनी ...

June 14, 2025
पर्वतीतील आई माता चौकात अपघातग्रस्त ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन
बातमी

पर्वतीतील आई माता चौकात अपघातग्रस्त ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

पुणे : पर्वती विधानसभा मतदारसंघातील आई माता चौक, गंगाधाम येथे वारंवार होणाऱ्या अपघातांना आळा बसावा यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ...

June 14, 2025
अपघात, मृत्यू आणि धार्मिक वर्तवणूक ; भारतातील प्रसारमाध्यमांचा अधोगतीकडे प्रवास!
बातमी

अपघात, मृत्यू आणि धार्मिक वर्तवणूक ; भारतातील प्रसारमाध्यमांचा अधोगतीकडे प्रवास!

मुंबई - गुजरातमधील एअर इंडिया बोईंग ७८७ विमान अपघातात तब्बल २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला असतानाही, भारतीय राष्ट्रीय मीडियाचे प्राधान्य 'भगवद्गीता ...

June 14, 2025
पुण्यात पावसामुळे महिला व मुलाचा मृत्यू, पायाभूत सुविधांवर प्रश्नचिन्ह
बातमी

पुण्यात पावसामुळे महिला व मुलाचा मृत्यू, पायाभूत सुविधांवर प्रश्नचिन्ह

पुणे – शहरात सुरु असलेल्या पावसाळ्याच्या तडाख्याने दोन दुर्दैवी घटना घडल्या असून, यामुळे प्रशासनाच्या पावसाळी तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. ...

June 14, 2025
Pimpari Chinchwad : ‘लो एमिशन जोन्स’सारख्या संकल्पना केवळ पर्यावरणपूरक नसून, जीवनशैलीच्या दिशेने उचलेले एक महत्त्वाचे पाऊल असते – आयुक्त शेखर सिंह
बातमी

Pimpari Chinchwad : ‘लो एमिशन जोन्स’सारख्या संकल्पना केवळ पर्यावरणपूरक नसून, जीवनशैलीच्या दिशेने उचलेले एक महत्त्वाचे पाऊल असते – आयुक्त शेखर सिंह

पिंपरी चिंचवड : विकसित औद्योगिक शहरामध्ये पिंपरी चिंचवड अग्रेसर आहे. मात्र विकसित शहरांमध्ये प्रदूषणाच्या समस्येवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवणे तितकेच महत्वाचे ...

June 13, 2025
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क