Prabuddh Bharat
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

अपघात, मृत्यू आणि धार्मिक वर्तवणूक ; भारतातील प्रसारमाध्यमांचा अधोगतीकडे प्रवास!

Prabuddh Bharat by Prabuddh Bharat
June 14, 2025
in बातमी, राजकीय, विशेष, सामाजिक
0
अपघात, मृत्यू आणि धार्मिक वर्तवणूक ; भारतातील प्रसारमाध्यमांचा अधोगतीकडे प्रवास!

अपघात, मृत्यू आणि धार्मिक वर्तवणूक ; भारतातील प्रसारमाध्यमांचा अधोगतीकडे प्रवास!

0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       

मुंबई – गुजरातमधील एअर इंडिया बोईंग ७८७ विमान अपघातात तब्बल २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला असतानाही, भारतीय राष्ट्रीय मीडियाचे प्राधान्य ‘भगवद्गीता सुरक्षित आहे’ या बातमीला देण्यात आले. ही बातमी “ब्रेकिंग न्यूज” म्हणून चालवली गेली, आणि या घटनेने पुन्हा एकदा भारतातील मीडियाच्या स्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

भारतातील माध्यम स्वातंत्र्याचा निर्देशांक १५१ व्या क्रमांकावर पोहोचला असून, १८० देशांतील स्थानिक व आंतरराष्ट्रीय पातळीवरील माध्यम स्वातंत्र्याचे मूल्यांकन करणाऱ्या ‘रिपोर्टर्स विथआउट बॉर्डर्स (RSF)’ या संस्थेच्या अहवालानुसार ही धक्कादायक घसरण नोंदवण्यात आली आहे. २०२३ मध्ये १६१, २०२४ मध्ये १५९ आणि आता २०२५ मध्ये भारताने १५१वा क्रमांक गाठला आहे. भारतातील डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) या हवाई सुरक्षेच्या प्रमुख संस्थेच्या ४८% जागा रिक्त आहेत. याचा अर्थ ही संस्था फक्त ५२% क्षमतेने कार्यरत आहे. या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या अपघातानंतर यंत्रणांची निष्क्रियता स्पष्ट होते. मात्र, याकडे दुर्लक्ष करून माध्यमांनी ‘धार्मिक ग्रंथ वाचला’ ही गोष्ट मोठी केली, जी सरकारी स्क्रिप्टप्रमाणेच वाटते, असा आरोप वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी केला आहे. याविषयी ट्विट करत त्यांनी म्हटले आहे की, “हवाई वाहतूक, पोर्ट्स, रेल्वे अशा सर्व गोष्टी खाजगीकरणाच्या नावाखाली अदानी-अंबानींना विकल्या जात आहेत. गुजरात पोर्टवर मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ (ड्रग्स) सापडत आहेत, तरीही माध्यमं गप्प राहतात. कारण, हे पोर्ट देखील अदानी यांच्याकडे आहेत.” सोशल मीडिया भाजपने हायजॅक केला आहे, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मिडिया उद्योगपतींच्या हातात गेले आहेत, त्यामुळे ‘लोकशाहीचा चौथा स्तंभ’ असलेल्या पत्रकारितेची विश्वसनीयता धोक्यात आली आहे, असा आरोपही त्यांनी केला. आज माध्यमांनी कोणती बातमी मांडावी, कोणती लपवावी आणि कोणती धार्मिक रंगात रंगवावी याचे निर्णय माध्यम संस्था नव्हे, तर सत्ताधारी पक्ष व उद्योगपती घेत आहेत, ही वस्तुस्थिती अस्वीकार करता येणार नाही. “माणसे मेली, परंतु ग्रंथ वाचला!” हे बातम्यांचे शीर्षक देशातील पत्रकारितेची गंभीर शोकांतिका दर्शवते, असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली.








       
Previous Post

पुण्यात पावसामुळे महिला व मुलाचा मृत्यू, पायाभूत सुविधांवर प्रश्नचिन्ह

Next Post

पर्वतीतील आई माता चौकात अपघातग्रस्त ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

Next Post
पर्वतीतील आई माता चौकात अपघातग्रस्त ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

पर्वतीतील आई माता चौकात अपघातग्रस्त ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

अभिजात मराठी "कोसळते" तेव्हा...
विशेष

अभिजात मराठी “कोसळते” तेव्हा…

आज सकाळी , नेहमीप्रमाणे सगळी वृत्तपत्रे घेऊन बसलो होतो. आधी मराठी वर्तमानपत्रांचा गठ्ठा काढला आणि धक्काच बसला. जवळपास सगळ्याच वर्तमानपत्रांनी ...

June 14, 2025
पर्वतीतील आई माता चौकात अपघातग्रस्त ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन
बातमी

पर्वतीतील आई माता चौकात अपघातग्रस्त ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

पुणे : पर्वती विधानसभा मतदारसंघातील आई माता चौक, गंगाधाम येथे वारंवार होणाऱ्या अपघातांना आळा बसावा यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ...

June 14, 2025
अपघात, मृत्यू आणि धार्मिक वर्तवणूक ; भारतातील प्रसारमाध्यमांचा अधोगतीकडे प्रवास!
बातमी

अपघात, मृत्यू आणि धार्मिक वर्तवणूक ; भारतातील प्रसारमाध्यमांचा अधोगतीकडे प्रवास!

मुंबई - गुजरातमधील एअर इंडिया बोईंग ७८७ विमान अपघातात तब्बल २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला असतानाही, भारतीय राष्ट्रीय मीडियाचे प्राधान्य 'भगवद्गीता ...

June 14, 2025
पुण्यात पावसामुळे महिला व मुलाचा मृत्यू, पायाभूत सुविधांवर प्रश्नचिन्ह
बातमी

पुण्यात पावसामुळे महिला व मुलाचा मृत्यू, पायाभूत सुविधांवर प्रश्नचिन्ह

पुणे – शहरात सुरु असलेल्या पावसाळ्याच्या तडाख्याने दोन दुर्दैवी घटना घडल्या असून, यामुळे प्रशासनाच्या पावसाळी तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. ...

June 14, 2025
Pimpari Chinchwad : ‘लो एमिशन जोन्स’सारख्या संकल्पना केवळ पर्यावरणपूरक नसून, जीवनशैलीच्या दिशेने उचलेले एक महत्त्वाचे पाऊल असते – आयुक्त शेखर सिंह
बातमी

Pimpari Chinchwad : ‘लो एमिशन जोन्स’सारख्या संकल्पना केवळ पर्यावरणपूरक नसून, जीवनशैलीच्या दिशेने उचलेले एक महत्त्वाचे पाऊल असते – आयुक्त शेखर सिंह

पिंपरी चिंचवड : विकसित औद्योगिक शहरामध्ये पिंपरी चिंचवड अग्रेसर आहे. मात्र विकसित शहरांमध्ये प्रदूषणाच्या समस्येवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवणे तितकेच महत्वाचे ...

June 13, 2025
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क